रत्नागिरी, 6 मे : आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारसू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोलगावमधील नागरिकांशी संवाद साधला. बारसू प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध होत आहे. उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल होताच नागरिकांनी बारसू प्रकल्प रद्द करा अशी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधतानाच बारसूवरून शिंदे , फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प नको, हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादू नका अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प नको, हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादू नका. मी इथ जन की बात ऐकण्यासाठी आलो आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीबाबत दिशाभूल सुरू आहे. कोकणातील जनता विकासविरोधी नाही. मात्र जर हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादणार असाल तर महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
स्थानिकांची घोषणाबाजी
आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारसू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोलगावमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रिफायनरी हटवा कोकण वाचवा अशी घोषणाबाजी स्थानिकांकडून करण्यात आली. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून अश्मयूगीन काताळ शिल्पाची देखील पहाणी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.