मुंबई, 21 मे : भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते मुंबई भाजपच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांची मोठी खुर्ची होती, तर उद्धव ठाकरे मात्र सोप्यावर बसलेले होते, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना देखील इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले शेलार
यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. ‘महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांची मोठी खुर्ची होती, तर उद्धव ठाकरे मात्र सोप्यावर बसलेले होते. तेव्हा मला ते गाणं आठवलं कोण होतास तू काय झालास तू, आमच्यासोबत होतात तेव्हा शिवतीर्थवर तुमची सभा गाजायची. आमच्यासोबत होता तेव्हा तुमच्या घरी सर्व नेते यायचे अन् आज तुम्हाला दारोदारी जावं लागतं’, असा हल्लाबोल शेलार यांनी केला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
ते पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईतील मतदारांनी उद्धवजींचं नेतृत्व अनेकवेळा नाकारलं आहे. आम्ही तुम्हाला हिंदुत्वामुळे पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेत अनेकवेळा शिवसेनेची घसरण झाली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत पन्नासचा आकडाही पूर्ण करणार नाही, असं शेलार यांनी म्हटलं आहे.
…तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, भाजपचा पुन्हा राज ठाकरेंना इशारा
राज ठाकरेंवर निशाणा
शेलार यांनी यावेळी राज ठाकरेंवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांना आमचं निवेदन आहे की तुम्ही उत्तम नेते आहात, अभ्यास करता पण सर्व विषयावर बोललं पाहिजे असं नाही. तुम्ही व्यक्तिगत माझ्यावर बोलाल तर ठीक आहे. पण तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत. आम्ही धरसोड करणारे नाहीत, मोदीजी जे करता ते प्रामाणिकपणे करता, असा टोला शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.