कोल्हापूर, 02 मे : मागच्या काही महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प न होण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहे. दरम्यान मागच्या 8 दिवसांपासून अचानक शेतकरी आक्रमक झाल्याने बारसू येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी याविरोधात आवाज उठवला. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनीही सरकारला थेट इशारा दिला होता. यावरून शेट्टींना रत्नागिरी जिल्हाबंदी तसेच सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश करण्यात आला आहे. काल (दि.01) रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसाकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. यामुळे आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदी बरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
ऊस लागवडीला फाटा देत शेतकऱ्यानं राबवला नवा प्रयोग, पाहा कसा झाला मालामाल? Photos
तुमच्या शहरातून (कोल्हापूर)
बारसू प्रकल्पास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केले आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जबरदस्तीने जमीनी संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर लाठीहल्ले, अश्रूधूरांचा वापर करून त्यांना सदर ठिकाणावरून हाकलून लावण्यात येत आहे.
यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली असून त्यांचे प्रतिनिधी त्याठिकाणी उपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केला आहे.
दरम्यान रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये 31 मे अखेर राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली आहे. तसेच सोशल मिडीयावरही पोस्ट, चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घातलेली आहे. अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. संतप्त झालेल्या राजू शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नसून ज्याठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे ऊभा राहणार असल्याचे सांगितले.
लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कावर गदा आणण्याचे काम सरकार करत असून राज्य सरकार जनरल डायर प्रमाणे वागू लागले आहे. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याची टिका राजू शेटटी यांनी केली आहे.
तलाठी 5 लाख तर सचिवांच्या बदलीसाठी 15 कोटी दर, राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप
दरम्यान काल रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी यांचेवतीने व जिल्हा पोलिस प्रमुख यांचेवतीने रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल होवून त्यांना समक्ष ही नोटीस लागू केली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याचो कारण दाखवित सदर नोटीस लागू करण्यात आलेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.