पुणे, 21 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी (19 मे) संध्याकाळी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. याबरोबरच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत असताना भाजपचे मित्रपक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी मात्र यावर अजब सल्ला दिला आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
पहिल्या नोटबंदीत देशाच्या अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. जनता बेकारी आणि महागाईने होरपळत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अशा स्थितीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी अजब सल्ला दिला आहे. ज्याप्रमाणे 2000 च्या नोटा चलनातून बाद केल्या त्याचप्रमाणे 500 आणि 100 च्या नोटा देखील चलनातून बाद कराव्यात, असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
2000 च्या नोटा मागे घेतल्यानंतर सदाभाऊ खोत यांचा अजब सल्ला#RBI #sadabhaukhot pic.twitter.com/EmGkLJpJjV
— News18Lokmat (@News18lokmat) May 21, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.