आज देशात महागाई इतकी वाढली आहे जनतेला रोजचा खर्च भागविणे देखील अशक्य झाले आहे.गॅस सिलिंडर जवळपास तिप्पट महाग झाले असून कुटुंबांनी ते भरणेच बंद केले आहे.
आदिवासी,गरीब,मध्यमवर्गीय कुटुंबाने स्वयंपाकासाठी पुन्हा एकदा आपला मोर्चा चुलिकडे वळवला आहे.ज्या प्रमाणात महागाई वाढली आहे.त्या प्रमाणात जनतेचे उत्पन्न वाढले नाही.रोजची कसरत करत ते जीवन व्यथित करत आहे.
ग्रामीण भागासह शहरी,निमशहरी भागात देखील काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक सुरू झाला आहे.ही सर्व परिस्थिती भयानक असून या घटकाला कुठलाही दिलासा केंद्रातील भाजपा सरकारकडून मिळताना दिसत नाही.ते देतील असा विश्वास देखील आता राहिला नाही.
त्यामुळे भारत जोडो यात्रेत सामान्य जनता सहभागी होत त्यांच्या या व्यथा व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही